SARDAR NETWORK 24×7 – DAINIK LATEST NEWS (सच आपकी जुबानी) 📍 भडगाव तालुका| प्रतिनिधी : आबा सूर्यवंशी
भडगाव तालुक्यातील गिरड सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये बेकायदेशीरपणे ‘आकडे’ टाकून वीज चोरी होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असून नागरिकांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, वीज चोरी रोखण्यासाठी कारवाईस जाणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी दमदाटी, दादागिरी आणि खोट्या तक्रारींच्या धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे.
⚠️ अनेक गावांमध्ये वीज चोरीचा प्रकार
गिरड, मानकी, भट्टगाव, पिंपळगाव, भातखंडे यांसह परिसरातील काही गावांमध्ये विजेच्या खांबांवर बेकायदेशीर ‘आकडे’ टाकून अनेक घरांना वीजपुरवठा केला जात असल्याचा आरोप आहे. हा प्रकार केवळ नियमबाह्य नसून, भविष्यात शॉर्टसर्किट, आग, विजेचा धक्का अशा गंभीर दुर्घटनांना कारणीभूत ठरू शकतो.
👷 कारवाईस गेलेल्या कर्मचाऱ्यांना धमक्या?
महावितरणचे अधिकारी, अभियंते आणि वायरमन हे वरिष्ठांच्या आदेशानुसार बेकायदेशीर जोडण्या काढण्यासाठी जात असताना काही व्यक्तींकडून त्यांना विरोध केला जात असल्याचे सांगितले जाते. “आकडे काढू नका, पुन्हा जोडून द्या, अन्यथा मारहाण करू, खोटे गुन्हे दाखल करू,” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी कारवाई करताना धास्तावल्याचे बोलले जात आहे.
⚡ जनतेच्या जीविताला धोका
तज्ज्ञांच्या मते, विजेच्या खांबांवर अनधिकृत पद्धतीने टाकलेले आकडे हे अत्यंत धोकादायक असून त्यातून कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे अशा बेकायदेशीर जोडण्या तातडीने हटविणे आवश्यक असल्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.
🚔 कठोर कारवाईची तयारी
महावितरण विभागाकडून अशा प्रकारांवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी वीज चोरीला पाठबळ न देता, जनहित आणि सुरक्षेच्या दृष्टीने महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.
📌 ठळक मुद्दे
✅ गिरड सबस्टेशन परिसरातील काही गावांमध्ये बेकायदेशीर वीज चोरीचा आरोप
✅ कारवाईस गेलेल्या कर्मचाऱ्यांना धमक्या व विरोध होत असल्याची माहिती
✅ अनधिकृत वीजजोडण्यांमुळे जीवित व वित्तहानीचा धोका
✅ महावितरणकडून कठोर कारवाईची तयारी
